मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई (राष्ट्रीय महत्वाचा बाजार)

स्थापना वर्ष / उद्दिष्ट्ये

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (राष्ट्रीय महत्वाचा बाजार) ही विशिष्ट अधिसूचित कृषि / फलोत्पादन/पशुधन उत्पादनांच्या व्यापारासंबंधात राज्य शासनाने गठित केलेली एक वैधानिक बाजार समिती आहे. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (राष्ट्रीय महत्वाचा बाजार) ची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न (पणन, नियमन व विकास) अधिनियम, १९६३ च्या तरतुदीनुसार १५ जानेवारी, १९७७ रोजी झाली. सदर कायद्याच्या कलम १२ अन्वये ही एक निगमित संस्था आहे. इतरांबरोबरच, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति (राष्ट्रीय महत्वाचा बाजार) स्थापनेची मुख्य उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत - कृषि मालासाठी आधुनिक बाजार आवार विकसित करणे, कृषि मालाच्या विपणनाचे नियमन करणे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळण्यास मदत करणे, व्यापाराच्या सुव्यवस्थित विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, बाजारांचे व्यवस्थापन व देखरेख करणे आणि बाजार क्षेत्रातील बाजारांच्या वापरासाठी अटी व शर्ती निश्चित करणे. समितीची स्थापना कृषि आणि काही इतर उत्पादनांच्या विपणनाचे नियमन करणे, त्यासाठी बाजारपेठांची स्थापना करणे आणि त्यानुषंगिक प्रयोजनांसाठी या उद्देशाने करण्यात आली आहे. उक्त कायद्याच्या तरतुदी, त्या अंतर्गत केलेले नियम आणि बाजार समितीचे उपविधीनुसार कृषि उत्पादनाचे विपणन नियंत्रित व त्याचे पर्यवेक्षण करणे समितीला आवश्यक आहे. व्यक्ती आणि वाहनांच्या प्रवेशाचे नियमन करणे तसेच भेसळ प्रतिबंधासाठी सर्व शक्य उपाययोजना करणे आणि प्रतवारी व मानकीकरण वाढवणे यासाठी समितीला अधिकार आहेत. अधिसूचित कृषि उत्पादनाचे उत्पादन तसेच साठवणूक, प्रक्रिया, किंमती आणि हालचाल याबाबतची माहिती गोळा करणे, जतन करणे आणि पुरवणे समितीला आवश्यक आहे.

समिती

यात शेतकरी, व्यापारी, मापारी आणि माथाडी यांच्यातून निवडून आलेले प्रतिनिधी असतात. तसेच, एनएनएमसी, बीएमसी आणि पणन संचालकांकडून प्रतिनिधी नामनिर्देशित केले जातात. समितीने निर्णय घेणे आणि त्याच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण करणे अपेक्षित आहे.

बाजार क्षेत्र

समितीच्या बाजार क्षेत्रात बृहन्मुंबई, ठाणे तालुका आणि रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील ३० गावे यांचा समावेश होतो. फळे आणि भाजीपाला व कांदा, बटाटा या शेतमालाच्या बाबतीत, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा केल्यानंतर बाजार क्षेत्र बाजार आवारांपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे.

सचिव

अप्पर निबंधक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति (राष्ट्रीय महत्वाचा बाजार) चे सचिव म्हणून नियुक्ती केली जाते. ते संस्थेचे प्रशासकीय प्रमुख असतात. सध्या मा. श्री. शरद जरे हे मुंबई कृषि उत्पन्न बाजार (राष्ट्रीय महत्वाचा बाजार) समिति चे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

उत्पन्न आणि खर्च

दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या मालमत्ता म्हणजेच दुकाने, कार्यालये, कॅन्टीन इत्यादींच्या हस्तांतरणासाठी हस्तांतरण शुल्क वाढवण्यात आले आहे. त्यामुळे हस्तांतरण शुल्कातून मिळणारे उत्पन्न वाढले आहे.

अ.क्र. वर्ष उत्पन्न खर्च अधिशेष
२०२५-२६ १२४२२.५५ लाख ११३६.४२ लाख १०५३.१३ लाख
२०२४-२५ १३२९६.४८ लाख १२१४१.४८ लाख ११५५ लाख
२०२३-२४ ११६९३.४३ लाख ११२९६.८८ लाख ३९६.५५ लाख

झलक

उद्दिष्ट्ये कृषि आणि काही इतर उत्पादनांच्या विपणनाचे नियमन. बाजार आवारांची स्थापना, देखभाल आणि विकास.
नियंत्रणाखालील वस्तू कांदा, बटाटा, सुका मेवा, मसाले, धान्य, तूप, फळे, भाज्या इत्यादी.
एकूण क्षेत्र ७२.५ हेक्टर
बाजारांची संख्या
परवानाधारकांची संख्या ८६२०
लिलाव हॉलची संख्या
दैनिक वाहनांची वाहतूक १३३०-१५२०