मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आपले स्वागत आहे

आजचे बाजारभाव

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई (राष्ट्रीय महत्वाचा बाजार)

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (APMC) (राष्ट्रीय महत्वाचा बाजार) ही विशिष्ट अधिसूचित कृषि/ फलोत्पादन/पशुधन उत्पादनांच्या व्यापारासंबंधात राज्य शासनाने गठित केलेली एक वैधानिक बाजार समिती आहे. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची (राष्ट्रीय महत्वाचा बाजार) स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न (पणन, नियमन व विकास) अधिनियम, १९६३ च्या तरतुदीनुसार १५ जानेवारी, १९७७ रोजी झाली. सदर कायद्याच्या कलम १२ अन्वये ही एक निगमित संस्था आहे. इतरांबरोबरच, मुंबई APMC स्थापनेची मुख्य उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत - कृषि मालासाठी आधुनिक बाजार आवार विकसित करणे, कृषि मालाच्या विपणनाचे नियमन करणे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळण्यास मदत करणे, व्यापाराच्या सुव्यवस्थित विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, बाजारांचे व्यवस्थापन व देखरेख करणे आणि बाजार क्षेत्रातील बाजारांच्या वापरासाठी अटी व शर्ती निश्चित करणे. समितीची स्थापना कृषि आणि काही इतर उत्पादनांच्या विपणनाचे नियमन करणे, त्यासाठी बाजारपेठांची स्थापना करणे आणि त्यानुषंगिक प्रयोजनांसाठी या उद्देशाने करण्यात आली आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

मा.श्री. जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
अध्यक्ष
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई
राष्ट्रीय महत्वाचा बाजार
तथा मंत्री, (पणन), महाराष्ट्र राज्य
मा. श्री. शरद जरे
सचिव
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई
राष्ट्रीय महत्वाचा बाजार

महत्वाच्या लिंक्स